देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत कलशच्या निर्माण साठी पाठवण्यात येणाऱ्या अमृत कलशाची मिरवणूक रानवली गावातून
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत श्रीवर्धन तालुका स्तरीय अमृत कलश कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला.श्रीवर्धन तालूक्यातील ४३ ग्रामपंचायत हद्दीतील मूठ भर माती या अमृत कलशामध्ये संकलित करण्यात आली आहे ही माती देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत 
वाटिका निर्माणासाठी पाठवली जाणार आहे.अमृत कलशाची मिरवणुक रानवली गावातून लेझिम पथकामध्ये वाजत गाजत काढण्यात आली.या कार्यक्रमास गजानन लेंडी – गट विकास अधिकारी,सुरेश मांडवकर – सरपंच,किशोर नागे – विस्तार अधिकारी, अताउल्ला जळगावकर- उपसरपंच, समीर फोपलनकर,भाविका जोशी,रिया बांद्रे, करुणा जाधव- सदस्य,अभिजीत माने- ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी कर्मचारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,राजीप शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. ए.आर. उंड्रे स्कूल चे मुख्यापक, शिक्षकवृंद,अंगणवाडी सेविका,आशा सेविका , विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













