नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मतदार याद्यांचे अचूक मॅपिंग हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट – आजचा महाराष्ट्र

मतदार याद्यांचे अचूक मॅपिंग हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट

प्रतिनिधी

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

ठाणे :- दि.१०( आ.मा.टॉ.टे.न्यू) मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी मतदार याद्यांचे शंभर टक्के मॅपिंग होणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र सध्या मॅपिंगच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत काहीसा मागे असून, विशेषतः ठाणे आणि पालघर सारख्या शहरी जिल्ह्यांनी आता अधिक गतीने काम करणे आवश्यक आहे. ९० ते ९४ टक्क्यांचा ‘मॅजिक फिगर’ ओलांडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आता झोकून देऊन काम करावे,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) पूर्वतयारी आढावा बैठकीत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, मीरा भाईंदरचे आयुक्त राधाविनोद शर्मा, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त अभिनव गोयल, भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगरच्या आयुक्त मनिषा आव्हाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. एस. चोक्कलिंगम यांनी तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाच्या सांगडीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदान अधिकारी यांनी केवळ कार्यालयीन कामकाज न करता प्रत्यक्ष क्षेत्रातील आव्हाने समजून घेतली पाहिजेत. मतदार यादीतील मतदारांचे २००२ च्या यादीशी किंवा त्यांच्या मूळ वास्तव्याशी मॅपिंग करणे हा या मोहिमेचा कणा आहे. जे मतदार सध्या उपलब्ध नाहीत, त्यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवून त्याचे छायाचित्र पुरावा म्हणून जपून ठेवावे. बीएलओ (BLO) यांनी घरोघरी जाताना जिओ-टॅगिंगसह फोटो काढणे बंधनकारक आहे, जेणेकरून कामाची पारदर्शकता टिकून राहील. तसेच, मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना चोक्कलिंगम यांनी दुबार नावे आणि अस्पष्ट फोटोंचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असणे ही गंभीर बाब असून, अधिकाऱ्यांनी स्वतःहून अशी नावे वगळण्याची प्रक्रिया राबवावी. “निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचा वापर केवळ पात्र भारतीय नागरिकांच्या नोंदणीसाठीच करत आहे, यात कोणतीही शंका राहू नये,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्या मतदारांचे संदर्भ सापडत नाहीत, त्यांना त्यांच्या मूळ गावाबद्दल किंवा जुन्या मतदार यादीतील नावांबद्दल विचारणा करून माहिती अद्ययावत करावी, असेही त्यांनी सुचवले.ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील जनजागृती मोहिमेचा अहवाल सादर केला आणि सोशल मीडियासह विविध माध्यमांतून ही मोहीम जनतेपर्यंत पोहोचवून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]