मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत तळा शहरात फिरते कलश

रायगड (तळा) :- मेरी माती मेरा देश’ मोहिमेअंतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीच्या वतीने तळा शहरात माती कलश फिरविण्यात आले.नगरपंचायत कार्यालय येथून चार चाकी विद्युत रोषणाई ने 
सजवून तळा शहरात फिरविण्यात आली.शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रभागातील माती या कलशामध्ये गोळा केली.माती गोळा केलेला कलश तळा नगरपंचायत कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला जाणार आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून कलशांमध्ये माती वाहून ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. या प्रवासात देशाच्या विविध भागातून 
झाडेही आणली जातील कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती यांचे मिश्रण करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देखील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक असेल.या कार्यक्रमा प्रसंगी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,मुख्याधिकारी माधुरी मडके,नगरसेवक,नगरसेविका,नगरपंचायत अधिकारी,कर्मचारी आणि तळेवसी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













