संतोष चव्हाण यांची वकिली परीक्षेत यशस्वी घोडदौड – संघर्षातून घडलेली प्रेरणादायी यशकथा

प्रतिनिधी
मुंबई (ठाणे) : ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ठाणे जिल्हा प्रवक्ते आणि भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आपल्या जीवनातील एक मोठं यश मिळवले आहे. अनेक अडथळे, संकटं आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी नुकतीच एल.एल.बी. (विधी पदवी) ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.सामान्य कुटुंबातून आलेले, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेले संतोष चव्हाण हे अनेक वर्षांपासून समाज परिवर्तनाच्या कार्यात
गुंतलेले आहेत. दिवस-रात्र मेहनत, कुटुंबाची जबाबदारी, सामाजिक कार्य आणि त्याचबरोबर शिक्षणाची जिद्द अशी त्रिसूत्री सांभाळत त्यांनी हे यश संपादन केलं आहे.वकिली परीक्षा ही केवळ कायद्याचं शिक्षण नसून, समाजासाठी न्यायाचा मार्ग खुला करणाऱ्या प्रवासाची सुरुवात असते. संतोष चव्हाण यांच्या यशामुळे अनेक संघर्ष करणाऱ्या तरुणांना नवा दिलासा मिळाला आहे. त्यांचा हा प्रवास म्हणजे “प्रत्येक संकटामागे एक संधी असते” या विचाराची जिवंत उदाहरण आहे.संतोष चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि कायदा या त्रैतीय मार्गावर ते आणखी प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.संघर्षातून साकारलेले स्वप्न – संतोष चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space