कोकणात पाच दिवसाच्या गौरी गणपतीचे विसर्जन परंपरेनुसार मोठ्या उत्साहात वाजत-गाजत पार पडले
रत्नागिरी (खेड)-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अजगणी या गावातील लोकांनी एकत्र येऊन गौरी व गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले. अजगणी गावातील अनेक वाड्या मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, मान्यवर तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे,कामगार जिल्हा सरचिटणीस मा. श्री. संदीप फडकले यांच्या माध्यमातून विसर्जन घाट बांधण्यात आला होता. गौरी गणपतीच्या विसर्जनाची सोय व्यवस्थित करण्यात आली होती .त्यामुळे समस्त ग्रामस्थांनी यावेळी श्री. संदीप फडकले यांचे खूप खूप आभार मानले .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













