शहिद हिराजी पाटील यांना वंदन करण्यास आगरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे–प्रा.डॉ.जयपाल पाटील
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग) :–भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून लढणारे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली या गावचे आगरी समाजातील ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत लढणारे पहिले शहिद हिराजी पाटील यांचा शुक्रवार २ जानेवारी स्मृतिदिना निमित्त त्याच्या कार्याची ओळख आगरी समाजातील तरुण, तरुणी,शालेय विद्यार्थी समाज बांधवांना व्हावी यासाठी रायगडचा युवक फाउंडेशनने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यांचे शुक्रवार २ जानेवारीला सकाळी 
७.३० वाजता आदर्श पतसंस्थेच्या अलिबागेतील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांकडून बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार आहे.यामधे अलिबाग तालुक्यातील इयत्ता ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी,११ वी ते१५ वी गट, व खुला यामधे सर्वाना भाग घेण्यास आवाहन केले होते, यात शहिद हिराजी पाटील यांचे जीवन चरित्रावर २ पुर्ण ताव मराठीत पाठवावा.असे प्रसिद्ध केले होते,यामधे गटास प्रथम क्रमांक रु.५०१,द्वितीय क्रमांक रु.३००,तृतीय रु.२०० व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. या पहिल्याच स्पधेॅत आर.सी.एफ. माध्यमिक विद्यालय कुरुळ ,जनरल अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,जे.एस.एम.कॉलेज येथून ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना मान्यवरांकडून बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार असून सहभागी विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे,अलिबागचे देशप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतात.सहभागीनां समारंभात बक्षीस, प्रमाणपत्र, त्वरित देण्यात येणार असून नंतर मिळणार नाही,याची नोंद घ्यावी असे प्रा.डॉ. जयपाल पाटील, यांनी कळविले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













