नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी – आजचा महाराष्ट्र

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

प्रतिनीधी. सतिश वि.पाटील 

मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका मोठ्या आणि विचित्र अपघाताचे वृत्त समोर आले आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवासी धावत्या ट्रेनमधून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी गंभीर झाल्याचे समजते. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे.लोकल आणि एक्स्प्रेसमधून १० ते १२ प्रवासी खाली पडले आहेत. यापैकी पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान ही घटना घडली आहे. धावत्या ‘पुष्पक एक्सप्रेस’मधून १० ते १२ प्रवासी खाली पडले. या घटनेत पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशी दरवाज्याला लटकले होते. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे. लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दिवा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. गर्दीच्या वेळेस घडलेल्या या भयंकर घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या अपघाता संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस घासली गेली..कल्याणहून मुबंई आठी निघालेली ८ वाजून ३६ मिनिटांला लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला घासली गेली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेमध्ये ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर गेल्या १५ महिन्यांत धावत्या रेल्वेतून पडून २७२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, धावत्या रेल्वेतून पडणे, रुळ ओलांडणे, तसेच गर्दीमुळे पडणे या कारणांमुळे प्रवाशांचे मृत्यू होत असतात. मागील काही महिन्यांमध्ये अनेक लोकांचा अशाप्रकारे लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा