नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोह्यातील पाच ग्रामपंच्यायतीच्या विजयी सरपंच, सदस्यांचा सुनिल तटकरे साहेबांच्या हस्ते सत्कार. – आजचा महाराष्ट्र

रोह्यातील पाच ग्रामपंच्यायतीच्या विजयी सरपंच, सदस्यांचा सुनिल तटकरे साहेबांच्या हस्ते सत्कार.

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करित रोहयात आजही व यापुढेही आम्हीच हे निवडणुकीतून सिध्द करुन दाखवले. गीता बाग या ठिकानी निवडून आलेल्या थेट सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला . या वेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटिल व महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे उपस्थीत होत्या.

        रोहा तालुक्यात पुई, पहुर, तळवली तर्फे अष्टमी, दापोली, खैरा खुर्द. अशा पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका या निवडणुक कालावधी संपल्याने घेण्यात आल्या होत्या. यामधे सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने निवडणूका अटीतटीच्या व चुरशीच्या होतिल असा अंदाज होता. त्यातच बदललेले सरकार, राजकिय घडामोडी यामुळे देखील रोह्यात अपेक्षित बदल होईल असे चित्र निर्माण झाले होते.मात्र राजकारणातील चिवटपणा सोडतील मग ते तटकरे कसले माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन केले आहे.

  पुई ग्रामपंचायतीत रुशाली संजय मांडलुस्कर तर तळवली ग्रामपंच्यायतीत रविंद्र रामचंद्र मरवडे  हे भरघोस मतांनी निवडून आले.

     सत्तेच्या माध्यमातून गावचा विकास व पाचही वर्ष जनतेच्या संपर्कात रहाणे हेच राष्ट्रवादीच्या यशाचे गमक असल्याचे बोलले जात आहे. रोहा तालुक्यात पेण, अलीबाग मतदार संघाचा भाग येत असला तरी या ठिकानी शिंदे सरकार चे आमदार असो वा भाजप, शेकाप चे आमदार असो रोह्यात कुणाचीच जादू चालली नसल्याचे निवडणुकीत दिसले उलट १५ वर्ष शेकापच्या ताब्यात असलेली दापोली ग्रामपंच्यायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फ़डकला व त्या ठिकानी बाळाराम रामा मोरे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. त्यामूळे महाविकास आघाडीत असलेल्या शेकाप चे सध्या राष्ट्रवादी शी पटेनासे झाले आहे. त्यामूळे ते सुनिल तटकरे साहेबांवर टिका करित आहेत. की यापुढे रायगडचा खासदार शेकाप ठरविणार हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे  बोलले जात आहे  तरी राष्ट्रवादी ला मिळत असलेला जनाधार पाहात सुनिल तटकरें यांचा बलाढ्य राष्ट्रवादी पक्षच रायगडच्या राजकारणाची दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]