रेल्वे थांब्यासाठी निवेदन सादर

रत्नागिरी (खेड)-दिवाणखवटी रेल्वे स्टेशन वर सकाळी दिव्यावरुन – सावंतवाडीला जाणारी व दुपारी सावंतवाडी वरुन – दिव्याला जाणारी 
रेल्वे गाडी ही कोविड-१९ पासून दिवाणखवटी रेल्वे स्टेशनला थांबत नसल्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांची २० किमी. ची हेळसांड होते. सदरची गाडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील
दिवाणखवटी रेल्वे स्टेशन हे प्रवेश द्वार असून सदरची लोकल गाडी थांबत नसल्यामुळे तिला थांबा देण्यात यावा या प्रवाशांच्या मागणी नुसार दिवाणखवटी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाणखवटी रेल्वे स्टेशन मास्तर यांना सरपंच सौ. रुपाली साळवी , उपसरपंच सौ. गीता शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले . त्या वेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. हर्षदा मोरे, सौ. दिपाली मोरे, श्री. मंगेश सागवेकर, श्री. कैलास यादव, श्री. दिलीप मोरे, श्री. लक्ष्मण शिंदे, श्री. मंगेश दळवी, श्री. गणेश गोपाळ दळवी हे उपस्थित होते. तरी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या निवेदनाचा विचार करून सदर गाडीला थांबा देण्यात यावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













