नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – आजचा महाराष्ट्र

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी

मुंबई : (आ.मा.टॉ.टे.न्यू) मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड

गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन झाले. चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार सना मलिक, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) च्या कोनशिलेचे अनावरण तसेच पॉड टॅक्सीसंदर्भातील बीकेसी कनेक्ट कंपनीने तयार केलेल्या कॉफीटेबल बुकचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.मेट्रो २ ब चा ५.६ किमीचा पहिला टप्पा आणि पाच स्थानके आजपासून सुरू होत असून उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुसंगत आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण मुंबई एकमेकांशी प्रभावीपणे जोडली जाणार असून, भविष्यात बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूरपर्यंत अखंड प्रवास सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो हार्बर लाईनला जोडणारी पहिली मेट्रो ठरत असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो २बी ही पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाईन असून, हार्बर लाईनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मेट्रो १, मेट्रो ३, मेट्रो ४, पश्चिम रेल्वे, मोनोरेल आणि हार्बर लाईन यांच्यात सुसूत्र जोडणी होणार आहे. सुमारे १०,९८६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील पहिला टप्पा ३,२२५ कोटी रुपयांचा असून, मंडाले डेपो हा या प्रकल्पाचा कणा ठरणार आहे. सुमारे ३०.४५ हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणारा हा डेपो देशातील सर्वात मोठा मेट्रो डेपो असेल. तसेच हा प्रकल्प ग्रीन मोबिलिटीचा उत्कृष्ट नमुना असून सर्व स्थानकांना आयजीबीसी ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे.या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागणार आहे. नागरिकांना अधिक आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. मेट्रो २बी प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत मल्टी-मोडल वाहतूक व्यवस्था निर्माण होईल आणि भविष्यातील ३३७ किमी मेट्रो नेटवर्क पूर्ण झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पालाची आज मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, ही सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा प्रकल्प दुबई आणि लंडनमधील सुविधांच्या धर्तीवर उभारला जाणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी मान्यवरांनी चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन मेट्रो स्थानक ते देवनार मेट्रो स्थानक दरम्यान मेट्रोतून प्रवास केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]