नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डोंबिवली : २७ गावाच्या स्वतंत्र महापालिकेची मागणी. – आजचा महाराष्ट्र

डोंबिवली : २७ गावाच्या स्वतंत्र महापालिकेची मागणी.

प्रतिनीधी: सतिश वि.पाटील 

डोंबिवली येथे समितीचे अध्यक्ष खासदार,सुरेश बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची प्रचंड भव्य जाहीर सभा सपन्न..

मुंबई :- रविवार,दि. १५/०६/२०२५ रोजी सायंकाळी होरायझॉन हॉल,डी मार्ट शेजारी,मानपाडा रोड,डोंबिवली (पु) येथे सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती (रजि.) या समितीच्या विविध सामाजिक विषयावर तथा महापालिकेच्या अनागोंधी कारभारावर लक्ष वेधण्यासाठी जाहिर सभेचे भव्य आयोजन आज करण्यात आले होते.सन १९८० च्या दशकात डोंबिवली,अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर येथील भागांचा समावेश करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना करण्यात येणार होती व तिला मिश्किलपणे “डाकू” महानगरपालिका म्हणून उपरोधकपणे जनता हिनवु लागली.उल्हासनगर,बदलापुर,अंबरनाथ मधील नागरी भागाच्या जनतेच्या रोशानंतर स्वातंत्र्य मिळाले परंतु ऊर्वरित कल्याण तालुक्यातील या ग्रामीण भागास दि.१ऑगस्ट १९८३ रोजी स्थापन झालेल्या क.डो.म.पा.मध्ये राहुन नरक यातना भोगाव्या लागल्या.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एका प्रकारे दरोडेखोर कार्यशैली असल्याकारणाने त्यामध्ये समाविष्ट केलेल्या काही भागातील नागरिक व आगरी समाज बांधवांनी त्यावेळी सातत्याने संघर्षरूपी उठाव करत राहिले..इतकेच नव्हे तर तब्बल ५ लोकसभा,४ विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणूकांवर संपूर्ण बहिष्कार घडवून आणला हे आपले सामर्थ्य. दिवंगत कामगार नेते स्व.रतन म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाने या संघर्षाने एका चळवळीचे रूप घेतले ती चळवळ म्हणजे सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती कालांतराने मा.राजारामजी साळवी साहेब यानी या समितीचे अध्यक्ष म्हणुन नेतृत्व केले.तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सन २

हजार सालचा काळ आला व या चळवळीचे जनक ठरले ते म्हणजे आगरी समाजाचे एक महान कार्यकुशल नेतृत्व लोकनेते स्व.दि.बा.पाटील साहेब….हीच ती संघर्ष समिती जिचे संस्थापक स्व दि.बा.पाटील साहेब झाले व त्यानंतर ही संघर्ष समिती अगदी दीर्घकाळात नाव लौकिक झाली.तिचे कार्य इतके प्रखर होते की तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख यांनी हा पिढीत कल्याण ग्रामीण मधील भाग दिनांक १२ जुलै २००२ रोजी वगळण्याची अधिसूचनाच काढली व येथे तब्बल १९ वर्षांच्या अथक संघर्षाने कल्याण डोंबिवली महापालीकेतुन बाहेर पडुन २७ गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन झाल्या. सर्वच ग्रामपंचायती स्वबळावर अगदी सुसज्ज व प्रगतशील झाल्या.त्यातील अनेक ग्रामपंचायती मा.राष्ट्रपती निर्मल ग्राम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.सर्व सुरळीत सुरू असताना अचानक जनमताच्या व तत्कालीन कोकण आयुक्त यांच्या शिफारशिच्या विरोधात जाऊन दिनांक ०१ जून २०१५ रोजी ही २७ गावे पुन्हा एकदा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. अजून पुन्हा एकदा संघर्ष समितीने भुतपुर्व अध्यक्ष गंगारामजी शेलार साहेब यांच्या नेतृत्वाने लढा उभारला व सरकारला आपली चूक लक्षात आली व तातडीने दिनांक ०७ सप्टेंबर २०१५ रोजी ही २७ गावे कडोमपा मधून वगळण्याचा निर्णय झाला.पण दुर्दैवाने राज्य निवडणूक आयोगाच्या हरकतीमुळे हा निर्णय अबादीत राहिले नाही.त्या मध्यात कल्याण डोंबीवली महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीने पुनःच त्या “दरोडेखोर” महानगरपालिकेच्या इतिहासाची जणू पुनरावृत्तीच केली. अपुऱ्या सुविधा,टॅक्सेसचा डोंगर,निकृष्ट नियोजन व २७ गावास सापत्न वागणूक ही नेहमीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत समाजाला मिळाली.अधिकृत आकडेवारी नुसार आपल्यावर डरडोई खर्चाच्या एक तृतीयांश इतके खर्च करणे कायदेशीर बंधनकारक असताना त्या उलट २७ गावांमधुन २०१५-२०२४ चे फक्त जमा कर संकलन हेच ११०० कोटी इतके असतांना आपणावर खर्च फक्त ३४२ कोटी इतके महानगरपालिकेमार्फत करण्यात आले.म्हणजेच एका प्रकारे आपणच या संपुर्ण क.डो.म.पा.चे पोशिदे आहोत असे बोलल्यास ते चुकिचे ठरणार नाही २७ गावांमध्ये २००२ नंतर ग्रामपंचयती झाल्यानंतर अधिकतर विकास झाला तो या “दरोडेखोर” महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रखडला गेला.सदर भागाचा विकास कमीच पण अधोगती जास्त झाली. असे असताना महापालिकेकडून सापत्न भावना व आपल्यावर तिचा झालेला बोज पत्करण्यापेक्षा आपल्या स्वातंत्र्याचा ४२ वर्ष जुना संघर्ष हा आता अधिक तीव्र करण्याची आवश्यकता उभी ठाकली आहे. म्हणूनच आगरी समाजाचे दिवंगत नेते स्व.रतन म्हात्रे साहेब व स्व.दि.बा.पाटील साहेब यांचे हे अधुरे स्वप्न सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून समितीचे वर्तमान अध्यक्ष कार्यसम्राट खासदार श्री.सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या बुलंद नेतृत्वाने पुन्हा एकदा नव्या जोमाने,ताकदीने व उमेदीने पूर्ण करूनच दाखवण्याचा निश्चय समितीने मनी बांधला असल्याने आजची २०२५ ची तथ्यात्मक परिस्थिती विचारात घेता व पुढील भविष्याचा विचार करता आताच स्वताची हक्काची “स्वतंत्र स्थानीक स्वराज्य संस्था” हवी याकरीता लढा आता उभारला आहे.याचे कारण या भागातील सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न संघठीत होवुन सोडवावे लागतील.त्याकरिता या जाहीर सभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या सभेला प्रचंड अशी गर्दी उसळली होती.सभेसाठी आज माजी आमदार मा राजू पाटील,जेष्ठ नेते डॉ वंडारशेठ पाटील,जेष्ठ नेते मा अर्जुनबुवा चौधरी,जेष्ठ नेते मा संतोष केणे,माजी स्थायी समिती सभापती मा रमेश म्हात्रे,मा.दीपेश म्हात्रे,मा.संदीप माळी,मा.बुधाजी वझे तसेच वारकरी समूदायाचे किर्तनकार व आदी सर्व पक्षीय नेते,कार्यकर्ते या जाहीर सभेला बहुसंख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा