आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणा संदर्भात दिव्यांगांचा उरण तहसील कार्यालयावर मूक मोर्चा.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे
रायगड (उरण) : दि १४ दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी धावणारा एकमेव नेता माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेने तहसील कार्यालयावर १३ जून २०२५ रोजी मूक मोर्चा काढून जाहीर पाठिंबा दर्शवत मूक मोर्चा काढला.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांगाचे आधारस्तंभ माजी आमदार बच्चू कडू हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाज घटकांच्या विविध मागण्यांकरीता अमरावती येधील गुरुकुंज मोझारी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलनास रविवार दि ०८ जून २०२५ रोजी पासून बसले आहेत. त्यांच्या आंदोलनास उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना व
दिव्यांग बांधवांतर्फे जाहिर पाठिंबा दर्शविण्याकरिता उरण मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार उद्धव कदम यांना सदर निवेदन देत असताना दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सदस्यांनी असे सांगितले की उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा तर आहेच. सरकारने लवकरात लवकर विविध मागण्यासंदर्भात मा. बच्चू कडू साहेबांनं सोबत चर्चा व्हावी त्या करीता सरकार दरबारी आपण आमची मागणी आपल्या माध्यमातून पोहचवावी. तसेच जर यापुढे सदर मागण्या संदर्भात अनुकूल चर्चा नाही झाली तर उरण तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील. बच्चू कडू साहेब हे शेतकरी आणि दिव्यांगांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आम्ही सध्या मूक मोर्चा काढत आपल्यासमोर आलो आहोत असे दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे. आणि त्या संदर्भात तसीलदार उद्धव कदम यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग सामाजिक संस्थेचे सर्व शिलेदार उपस्थित तर होतेच त्याचबरोबर उरण तालुक्यातील इतर सामाजिक संघटनेचे सदस्य ही उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space